रब्बी व उन्हाळी हंगामात पाण्याची गरज कमी असलेल्या पिकांची निवड करा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

दूधगंगा धरणात उपयुक्त पाणीसाठा आता 22.82 टी.एम.सी

कोल्हापूर : दूधगंगा धरणाची एकूण पाणी साठा क्षमता 25.40 टी.एम.सी.असून मागीलवर्षी दूधगंगा धरणाच्या गळतीच्या पार्श्वभूमीवर तो 20.54 टी एम सी करण्यात आला होता. मागच्या वर्षीच्या दुष्काळाच्या परिस्थिती मध्ये जून मध्ये पावसाने ओढ दिल्याने पाणी साठा सिंचनासाठी अपूरा झाला होता. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून धरणात एकूण पाणी साठा 24.22 टी.एम.सी. व त्यातील उपयुक्त पाणीसाठा 22.82 इतका करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत आवर्तन सुरू असून सध्याचा एकूण पाणी साठा 23.25 तर उपयुक्त पाणीसाठा 21.85 टीएमसी आहे. आता दूधगंगा धरणाच्या गळती प्रतिबंधक कामास  प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. गळती प्रतिबंधक कामास यावर्षी सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार आहे. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवश्यक पाणीसाठा धरणामध्ये ठेवण्यात येईल. परंतु सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, रब्बी व उन्हाळी हंगामा करिता पिकांची निवड करताना पाण्याची गरज कमी असलेल्या पिकांची निवड करण्यात यावी. तसेच ऊस पिकाचे निवड करताना नदीच्या लाभक्षेत्रात नेहमी प्रमाणे लागण करून दूधगंगा धरणाच्या कालव्याच्या लाभ क्षेत्रामध्ये मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात यावी, तसेच मागील वर्षी पेक्षा जास्त ऊसाची लागण करु नये, जेणेकरून आर्थिक नुकसान टाळणे शक्य होईल.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.