विनायक जितकर
आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्यास यश…
मुंबई – मुंबई शहराच्या जडण-घडणीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या गिरणी कामगारांच्या प्रलंबित घरांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षेतखाली सहयाद्री अतिथीगृह मुंबई येथे आज संपन्न झाली. गेली क्रित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री महोदय यांचेकडे बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार आज सह्रयाद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
गिरणी कामगारांच्या घरांची किंमत निश्चीत करणे, सदनिका वाटपाची प्रक्रिया करणे व सदनिका वाटपासाठी गिरणी कामगारांची पात्रता निश्चीत करणे या करीता गेल्या १० ते १२ वर्षापासुन संथ गतीने प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे गिरणी कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. यासाठी त्याची छाननी वेळेत करण्यात आली पाहीजे याकरीता ३ महीन्यांचा कालावधी निश्चीत करण्यात यावा अशी मागणी केली.
यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया 3 महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता हौसिंग स्टॉक वाढविण्याची आवश्यकता आहे. रांजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश देतानाच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आम्ही मार्गी लावत असल्याची ग्वाही दिली. |
यावेळी बैठकीस मंत्री दिपक केसरकर, खासदार राहूल शेळाळे, खासदार धैर्यशिल माने, आमदार सुनिल राणे, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार प्रकाश सुर्वे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्रयांचे प्रधान सचिव भुषण गगराणी, प्रधान सचिव वित्त राजगोपाल देवरा, प्रधान सचिव नगरवीकास-१ असिमकुमार गुप्ता, म्हाडा सीईओ संजिव जैस्वाल, प्रधान सचिव कामगार विनीता वेद-सिंगल यांच्यासह सर्व गिरणी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.