भागीरथी महिला संस्थेच्या वतीन पोलीस बांधवांना राखी बांधण्याचा उपक्रम…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सलग चौदाव्या वर्षी पार पडला रक्षाबंधन सोहळा…

कोल्हापूर – पोलीस बांधव २४ तास जनसेवा बजावत आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ते चोखपणे बजावतात. कुटुंबांपेक्षाही जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देतात. सण, उत्सव कुटुंबीयांसमवेत साजरे करता येत नाहीत. समाजाप्रती त्यांच असलेलं योगदान लक्षात घेऊन गेल्या १४ वर्षापासून भागीरथी महिला संस्थेच्या वतीन पोलीस बांधवांना राखी बांधण्याचा उपक्रम साजरा केला जातो. आज शहरासह ग्रामीण भागातील ६ पोलीस ठाण्यात हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी हजारो महिलांना घडवलंय. स्वयंरोजगार, स्वसंरक्षण, बचत गटांची उभारणी आणि महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासह विविध उपक्रम राबवण्याच काम त्या करत आहेत. याच माध्यमातून गेली १४ वर्षे पोलीस दलातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांविषयी आदरभाव व्यक्त करण्याच्या उद्देशान रक्षाबंधन उपक्रमाच आयोजन केल जात. यंदाही कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी तसंच कागल आणि गांधीनगर पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.

जुना राजवाडा पोलीस ठाण्यात रक्षा बंधन उत्सवाच्या पूर्वदिनी भागीरथी महिला साफ्तेदारी उपक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं संस्थेच्या अश्विनी वास्कर, शोभा कोळी, सरिता हरुगले, सविता कोळी, माधुरी पवार, अश्विनी सरनाईक, सुनिता कोळी, दिपाली चौगुले, प्रज्योती दावणे, शर्वरी भोसले, प्रीती खोत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच औक्षण केलं. त्यांना राखी बांधून समाजासाठी त्यांच्याकडून होत असलेल्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश कवठेकर यांचा लक्षतीर्थ वसाहत इथल्या सामाजिक कार्यकर्त्या शिवानी पाटील, अर्चना पांढरे, शरयू भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसंच निरीक्षक अविनाश कवठेकर, उपनिरीक्षक इकबाल महात, हवालदार एकनाथ कळंत्रे यांच्यासह कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांनी समाजातील युवती, महिला यांचं संरक्षण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अश्विनी पाटील, ज्योती घावरे, राधिका पाटील, चांदणी कांबळे, रंजना यादव, माधुरी शिंदे उपस्थित होत्या.

शाहूपुरी पोलीस ठाण्यात देखील भागीरथी महिला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधन उपक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रभारी पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कोल्हाळ, उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या राजश्री मोटे, देवस्थान समितीच्या माजी सदस्य संगीता खाडे, पूजा सन्नके, छाया साळुंखे, रंजना शिर्के, अर्चना मेढे, शारदा पोटे, छाया पाटील, आश्विनी पंडित यांनी औक्षण करून उपस्थित वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना राखी बांधली.

यासोबतच राजारामपुरी पोलीस ठाण्यातही हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्यात कल्पनेतून दरवर्षी हा उपक्रम साजरा केला जात असल्याच शितल तिरुके यांनी सांगितलं या पोलिस ठाण्यातील सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महिलांनी राखी बांधून समाजासाठी यापुढेही नेहमी सकारात्मक दृष्टीन सहाय्याची भूमिका ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. हा उपक्रम शहरा नजीकच्या ग्रामीण भागातही राबवण्यात आला. कागल आणि गांधीनगर पोलीस ठाण्यातही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भागीरथी महिला संस्थेच्या कार्याच आणि उपक्रमाच कौतुक केलं.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.